15 C
New York
Wednesday, April 23, 2025

Buy now

मा. आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर वाढदिवस विशेष !

सिंधुदुर्गातील बेधडक नेतृत्व

विधानपरिषद निवडणूकीत शेवटच्या क्षणी तिकीट कापल्याने नाराज होऊन परशुराम उपरकर यांनी २०१२ साली शिवसेना सोडली. राजकारणात जर-तरला काहीच अर्थ नसतो. तरी सुद्धा काही गोष्टी काळाच्या पटलावर जर तरच्याच कसोटीवर पडताळून पाहाव्या लागतात. जर त्यांनी शिवसेना सोडली नसती तर दोन वर्षांनंतर होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत हे विधानपरिषदेत आमदार असल्याने रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची उमेदवारी त्यांनाच मिळाली असती.

२०१४ साली मोदी लाटेत शिवसेनेचे जे १८ खासदार निवडून आले, त्यात त्यांचासुद्धा निश्चितपणे समावेश झाला असता. २०१९ साली रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात समोर अपक्ष उमेदवार उभा असल्यामुळे ते पुन्हा एकदा निर्विवादपणे खासदार बनले असते. अशा प्रकारे शिवसेना सोडल्यामुळे त्यांनी दोन टर्म लोकसभेची खासदारकी गमावली, शिवसेना या चार अक्षरांसाठी घरा दारावर तुळशीप्छ ठेवून काहीही करण्याची तयारी असलेली शिवसैनिकांची फळी शिवसेना प्रमुखांच्या तालमीत तयार झाली होती. परशुराम उपरकर हे त्याच फळीतील एक नाव आहे.९० च्या दशकात जनता दल आणि काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेऊन जीजी उपरकर नावाचा तरुण शिवसेनेची पाळेमुळे सिंधुदुर्गात रुजवू पाहत होता. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून १९८३ साली सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘भगवा सप्ताह’ आयोजित करण्यात आले.

१९८८ साली कणकवली ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक लागली. परशुराम उपरकरांनी ही पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. एरव्ही काँग्रेस व जनता दल पक्षाचे जिल्ह्याच्या नव्हे तर संपूर्ण देशाच्या राजकारणात विळी-भोपळ्याचे वैर होते; परंतु सिंधुदुर्गात पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवून शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठल्याही निवडणुकीत शिवसेना पक्षाला मिळालेला हा पहिला विजय होता. त्याकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना फोफावण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करत सर्वांत जास्त त्याग कोणी केला असेल, पक्षासाठी विरोधकांचे वार अंगावर होलून पक्षाला संजीवनी देण्यासाठी झटलेले नाव फक्त परशुराम उपरकरच…! नारायण राणेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच कणकवली-मालवण विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली होती. त्यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यासाठी कोणीच तयार नव्हते. त्यावेळी परशुराम उपस्कर शड्डू ठोकत मैदानात उत्तरले.

कणकवली- मालवण विधानसभा पोटनिवडणुकीसाठी परशुराम उपरकरांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेव ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केली आणि संघटनेच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी शिवसेनाप्रमुखांसह संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसेना सिंधुदुर्ग जिल्ह्यात उतरली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदाच मालवणच्या जाहीर सभेत कोकणी जनतेसमोर नतमस्तक झाले. निवडणूक निकालाअंती परशुराम उपरकरांचा पराभव झाला असला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेचे अस्तित्व त्यांनी विरोधकांना दाखवून दिले, परशुराम उपरकर यांनी पोटनिवडणुकीदरम्यान दाखवलेल्या लहवय्येपणाचा यथोचित सन्मान म्हणून शिवसेनाप्रमुखांनी त्यांना विधानपरिषदेत आमदारकीची बक्षिसी दिली. आमदारकीच्या कार्यकाळात त्यांच्यामध्ये इतकी वर्षे दडून राहिलेल्या अभ्यासू नेत्याची हालक जिल्हावासीयांना अनुभवायला मिळाली.

सन २००८मध्ये राज ठाकरेंनी शिवसेनेशी फारकत घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यावेळी भगव्याचे पाईक असलेले जीजी शिवसेनेतच राहिले. मात्र, पक्षनेतृत्वाचे कान भरण्याची रणनीती त्यांच्या काही पक्षांतर्गत शत्रूनी आखली. ते एका दौऱ्यावर असताना त्यांना विमानतळावर समोर राज ठाकरे दिसले. आता पक्ष वेगळे झालेले असले तरी कधी काळी आपण राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम केले आहे, याची मनोमन जाणीव ठेवून जीजींनी त्यांना वाकून नमस्कार केला, त्यांच्या हितशत्रूनी तातडीने ही गोष्ट मीठमसाला लावून पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवली.

परशुराम उपरकर मनसेत प्रवेश करणार आहेत, अशी अफवा पसरवून त्यांनी पक्षश्रेष्ठींच्या मनात त्यांच्याविषयी संशयाचे वातावरण निर्माण केले. कोकणात मनसे या पक्षाची राजकीय प्रगती होण्याची कोणतीही शक्यता नसताना जीजींसारखा नेता त्या पक्षात प्रवेश करण्याची सुतराम शक्यता नव्हती, मात्र, गोबेल्स नीतीचा अवलंब करून ही गोष्ट पक्षनेतृत्वाच्या मनावर बिंबवण्यात त्यांचे पक्षांतर्गत शत्रु यशस्वी ठरले. अशाप्रकारे विधानपरिषदेत वादळी कारकीर्द गाजवणारा कडवट शिवसैनिक स्ठकीयांच्या कपट कारस्थानांना बळी पडला आणि त्याचीच परिणिती म्हणून परशुराम उपरकरांचे विधानपरिषद निवडणुकीचे तिकीट कापण्यात आले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवारांनी कोकणातील या झुंजार नेत्याला विधानपरिषदेची ऑफर दिली होती. मात्र, बाळासाहेब ठाकरे हयात असेपर्यंत आपण शिवसेना सोडणार नाही, असे सांगून त्यांनी ती ऑफर विनम्रतापूर्वक नाकारली.

शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर त्यांनी पक्षांतर्गत विरोधाला कंटाळून राज ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. खरेतर ही एक प्रकारची राजकीय आत्महत्याच होती. मनसेत बारा वर्षे काम करत असताना त्यांनी चुकूनसुद्धा ठाकरे कुटुंबावर किंवा उद्धव ठाकरेंवर कधीही टीका केली नाही. सिंधुदुर्गातील शिवसैनिकांना पक्षातील नेत्यांपेक्षा मनसेत काम करणाऱ्या जीजींचाच जास्त आधार वाटायचा. राज ठाकरेंची नारायण राणेंसोबत असलेली मैत्री सर्वश्रुत आहे. त्यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात त्यांनी ओम गणेश बंगल्यावर आऊन अनेकदा नारायण राणेंची भेट घेतली. पण, त्यावेळी जीजी कधीही राणेंच्या घराची पायरी चडले नाहीत. त्यांनी राजकारणात राहून कधीही आपल्या तत्त्वांशी तडजोड केली नाही.

नव्या राजकीय समीकरणानंतर जीजींना पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा झेंडा खुणावत होता. त्याचवेळी लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी मैत्रीखातर नारायण राणेंसाठी जाहीर सभा घेण्याचे मान्य केले आणि परशुराम उपस्करांनी उद्धवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा एकदा सत्ता गेली आहे आणि आमदार-खासदारांची संख्या शून्यावर आल्यामुळे उद्ध‌वसेना पक्ष संघटनेच्या भवितव्याचाच प्रश्न निर्माण झालाय. अशा प्रतिकूल परिस्थितीत कोणत्याही पदाची अपेक्षा न करता परशुराम उपरकर नामक कडवट शिवसैनिक पुन्हा एकदा संघर्ष करण्यासाठी आपल्या मूळ पक्षात परतलाय, संघर्षकाळात अशाच लढवय्या सैनिकांची संघटनेला गरज असते. परशुराम उपरकरांना त्यांच्या वाढदिवशी पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो.

– अनुपम कांबळी

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!