सावंतवाडी : सिंधुदुर्गच्या विकासासाठी गेल्या दहा वर्षात काही करता आले नाही ते आता जनतेला विकास करणार असे सांगून भुलवीत आहेत परंतु येथील जनता सुज्ञ असून त्यांच्या ह्या भूलथापांना ते बळी पडणार नाही त्यामुळे विनायक राऊत यांचे दुकान लवकरच बंद होणार आहे अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आरोंदा येथे आयोजित महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात केली तर येणाऱ्या काळात ठाकरे सेनेतील अनेक खासदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.