ट्राफिक पोलीस नाहीच ? ; बेशिस्त वाहनपार्किंग ठरतेय डोकेदुखी
किनई रस्त्याचा वापर झाल्यास एकमार्गी वाहतूक सुरळीत होईल
फुटपाथ, सर्व्हिस रस्त्यांवर विक्रेत्यांनी थाटली दुकाने ; नगरपंचायतचे दुर्लक्ष
कणकवली : कणकवली ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती बाजारपेठ आहे. सध्या मे महिन्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात चाकरमानी वर्ग मोठ्या प्रमाणात दाखल झाला आहे. असे असताना कणकवली बस स्थानक ते एस एम हायस्कूल पर्यंत सर्व्हिस रत्याच्या दोन्ही बाजुला मोठी वाहतूक कोंडी होत आहे. कसे काही असेना वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ओव्हरब्रिज खाली वाहन पार्किंग केले जाते. मात्र काही वाहन चालक अगदी बेशिस्त पणे वाहने थेट रस्त्यावरच पार्किंग करून खरेदी -विक्री साठी जातात. त्यामुळे बहुधा कणकवली शहरातील बस स्थानक ते एस. एम हायस्कुल परिसरात सर्व्हिस रस्त्याच्या दोन्ही बाजूला तसेच कणकवली आचरा मार्गावर पटवर्धन चौक ते पोलीस ठाणे दरम्यान मोठी वाहतूक कोंडी होते.
सदर मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे मात्र याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. वाहनचालक देखील धाक नावाची गोष्ट बाळगत नाही. मग अशांना सोडून द्यावे की कारवाई योग्यच आहे ? मात्र प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. कणकवली पटवर्धन चौकात दोन वाहतूक हवालदार नेमलेले आहेत. मात्र बस स्थानक ते एस एम हायस्कूल पर्यंत झालेले ट्राफिक सुरळीत करताना एकच पोलीस हवालदार पाहायला मिळतो. मग इतरांच काय ? तूर्तास तरी अजून दोन वाहतूक पोलीस हवालदारांची कणकवली शहरात वाढलेल्या ट्राफिक च्या पार्श्वभूमीवर गरज आहे.