कणकवलीत ‘खाऊगल्ली २०२६’ उत्साहात
कणकवली : राजकारण आणि निवडणुका येत-जात राहतात, पण जनतेची सेवा करणे आणि त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे. पालकमंत्री नाम. नितेश राणे आणि माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या नेतृत्वाखालील टीम ‘खास. नारायण राणे यांच्या’ संस्कारांतून घडलेली असून, पद असो वा नसो, जनतेची सेवा हीच आमची ओळख आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले.



