32.9 C
New York
Wednesday, June 25, 2025

Buy now

पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या अमितचा शोध घेण्यास एनडीआरएफच्या पथकाला अपयश

गाळ असल्यामुळे मदत कार्यात अडचणी ; काळोख पडल्यामुळे शोध मोहीम थांबवली

कुडाळ : माणगाव खोऱ्यातील वसोली नदीपात्रात पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या अमित धुरी (वय ३०, रा. माणगाव-धरणवाडी) याची शोध मोहीम सायंकाळी काळोख पडल्यामुळ थांबविण्यात आली. उद्यापासून पुन्हा शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. दरम्यान या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ असल्यामुळे मदत कार्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे असेच प्रकार यापूर्वी घडले असल्यामुळे गाळ काढण्यासाठी योग्य ते प्रयत्न व्हावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. माणगाव खोऱ्यातील वसोली-सतयेवाडी येथील कॉजवे वरून जात असताना अमित हा पाण्याचा प्रवाहाबरोबर वाहून गेला होता. तर त्याच्यासमवेत असलेले सखाराम कानडे (वय ६३) हे या अपघातातून वाचले होते. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच वसोली सरपंच अजित परब, निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव.शिवापुर ग्राम महसूल अधिकारी सुरज भांदिगरे,वसोली ग्रामसेवक अनिल कदम,ग्राम महसूल अधिकार ग्रामपंचायत वसोली ओंकार मणचेकर,योगेश धुरी आदिंसह ग्रामस्थ व नागरीक झाले. यावेळी पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम व तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी चर्चा करून मंगळवारी सकाळपासून शोधमोहीम सुरू करण्याचे नियोजन केले, तशा आपल्या यंत्रणेला सुचेना दिल्या. वसोली कुत्रेकोंड येथे सोमवारी रात्री माणगाव येथील युवक अमित धुरी वाहुन गेला, त्याचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ पथकाचे २२ जणांचे पथक तसेच या भागातील सरपंच अजित परब, मंडळ अधिकारी रजनी ढवळ,अनिल राणे तलाठी सुरज भांदिगरे,ग्रामसेवक अतुल कदम,पोलीस पाटील,कोतवाल यांच्यासह स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत प्रशासनाने शोध मोहीम हाती घेतली. नदिपात्राच्या दुतर्फा तीरावर एनडीआरएफच्या पथकाने व नागरिकांनी अमितचा शोध घेतला मात्र सायंकाळी उशिरापर्यंत अमितचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली. वसोली- सतयेवाडी येथील काॅजवे सखल व काहीसा लांब आहे तसेच त्या कॉजवेला गार्ड स्टोन सुध्दा नाहीत.त्या काॅजवेतील पात्रात गाळ साचल्याने पाऊस जरा वाढला तरी लगेचच काॅजवेवर पाणी येते.त्यामुळे वाहतुकीची ये-जा बंद होते.या काॅजवेच्या बाजूला लोखंडी साकव आहे मात्र त्यावरून कसरत करत मोटरसायकल न्यावी लागते म्हणून अनेकजण काॅजवेवरुनच जाण्याची रिस्क घेतात.अशाच पध्दतीने ये-जा करताना यापुर्वी पावसाळी मौसमात चार-पाच अप्रिय घटना घडल्या आहेत. त्यात गणेश कुंभार नामक युवकाचा वाहुन मृत्यू झाला तर इतर तीन-चार घटनांमध्ये मोटरसायकल स्वार सुदैवाने बचावले.या सर्व घटनांची चर्चा अमितच्या वाहून जाण्याने चर्चिल्या गेल्या.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!