16.8 C
New York
Saturday, June 14, 2025

Buy now

कलमठ ग्रामपंचायतच्या स्तुत्य उपक्रमातून जनतेला दर्जेदार सेवा मिळेल

पालकमंत्री ना. नितेश राणे यांचा विश्वास

आपल्या पदाचा सकारात्मक वापर जनतेच्या हितासाठी करावा

कणकवली ( मयुर ठाकूर ) : प्रत्येक क्षेत्रातील अधिकारी, सरपंच यांची इच्छाशक्ती अतिशय महत्त्वाची आहे. आपण सुरू केलेली ही प्रक्रिया पुढे कुठे थांबता नये. आव्हाने येणार हे समजून चालले पाहिजे. ज्याला काहीही करून आपण सुरू केलेली सेवा बंद करू द्यायची नाही त्यासाठी जो मार्ग काढायचा असेल तो काढण्याची तयारी दाखवली तर यामध्ये कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. चांगली काम केली तर लोकांच्या चेहऱ्यावर आनंद येतो आणि आशीर्वाद मिळतात. ज्या ज्या खुर्चीवर बसलेले जे जे अधिकारी आहेत त्यांनी आपल्या पदाचा वापर आपल्याकडे आलेल्या व्यक्तीच्या आयुष्यात परिवर्तन आणण्यासाठी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले.

यावेळी ते कलमठ ग्रामपंचायत येथे आपले सरकार सेवा केंद्र या उपक्रमाचा पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी ना. नितेश राणे बोलत होते.

या कार्यक्रमाला व्यासपीठावर जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारीअधिकारी माणिक दिवे, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, प्रमोद ठाकूर, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, वैभववाडी तहसीलदार सूर्यकांत पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, प्रवीण कुडतरकर ,दिनेश गोठणकर, नितीन पवार, महेश लाड अनुप वारंग, विनिता बुचडे,पपू यादव , सचिन खोचरे,श्रेयस चिंदरकर, सुप्रिया मेस्त्री, स्वाती नारकर, नजराणा शेख, निसार शेख,आबा कोरगावकर, संतोष रेवंडकर, प्रवीण सावंत, स्वरूप कोरगावकर, समर्थ कोरगावकर, ऋत्विक राणे, प्रथमेश धुमाळे, मिलिंद चिंदरकर आदी उपस्थित होते.

पुढे पालकमंत्री ना. नितेश राणे म्हणाले, गतिमान सरकार आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेलं रयतेच राज्य हे काय असतं याचे उत्तम उदाहरण म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली असलेलं महायुतीचं सरकार आहे. महायुती सरकारने पहिल्या दीडशे दिवसांमध्ये जी काही लोकाभिमुख आणि पारदर्शकतेच्या दिशेने पाऊले टाकायला सुरुवात केली आहे. ग्रामीण भागामध्ये शेवटच्या टोकापर्यंत असलेली व्यक्ती किंवा नागरिकांना सर्व प्रकारच्या सेवा सुविधा मिळाल्या पाहिजे. त्यांना शासकीय कार्यालयांमध्ये अनेक वेळा फेऱ्या माराव्या लागता नयेत. आपली कामे कमी वेळेत झाली पाहिजेत. आधुनिकतेकडे जाणार आपलं जग हे थेट आपल्या गावापर्यंत कसं नेता येईल या दृष्टिकोनातून हा उपक्रम अतिशय महत्वाचा आहे. AI सिंधुदुर्ग असो किंवा AI महाराष्ट्र असो यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. तसेच कलमठ ग्रामपंचायत जे उपक्रम राबवत आहे, असे उपक्रम राबविणे काळाची गरज आहे, असेही मंत्री ना. नितेश राणे म्हणाले.

AI सिंधुदुर्ग AI महाराष्ट्र ही अशी चळवळ आहे जी सामान्य नागरिकांच्या आयुष्यामध्ये फायदेशीर ठरू शकेल आणि त्यांचा वेळ व खर्च वाचू शकेल. इतर कोणते दाखले घ्यायचे असतील तर लागणारा वेळ आणि होणारा खर्च या प्रक्रियेमुळे कमी होऊ शकेल. त्यामुळे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नामध्ये निश्चितपणे हातभार लागेल अशा दृष्टिकोनातून या कार्यक्रमाकडे पाहिले पाहिजे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी AI च्या माध्यमातून एक रामबाण उपाय काढला आहे. आमचा महाराष्ट्र हा AI च हब म्हणजे AI चा देशातला केंद्रबिंदू कोणता असेल तर ते आपल महाराष्ट्र राज्य असलं पाहिजे, या दृष्टिकोनातून पावले उचलली आहेत. कोणतेही नवीन उपक्रम सुरू करताना अनेक आव्हाने येत असतात.

सिंधुदुर्ग जिल्हा साक्षरतेमध्ये पुढे आहे. लोकांना मदत केली तर लोक सहकार्य देखील करतील. फक्त अधिकाऱ्यांनी आपल्याला मदत करायची आहे या दृष्टीकोनातून मानसिकता ठेवली पाहिजे. तसं पाहिलं तर कलमठ हे शहर आहे. A, B, C नुसार गावांची विभागणी करा आणि त्यानुसार त्या त्या भागात नेटवर्कची समस्या असेल किंवा अन्य काही दुर्गम भागामध्ये काही यंत्रणा लावू शकतो का याचा अभ्यास करून त्या प्रकारची यंत्रणा तयार करा. जेणेकरून तिथेही असे उपक्रम राबवता येतील, अशा सूचना देखील मंत्री ना. नितेश राणे यांनी दिल्या. तसेच AI च्या प्रवासात सर्वात अग्रेसर असलेला जिल्हा हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे, याची मुख्यमंत्र्यांकडे नोंद कशी होईल या दृष्टीने काम सुरू असल्याचेही मंत्री ना. नितेश राणे यांनी सांगितले.

आपले सरकार सेवा केंद्र या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक दिवे यांनी केले. यावेळी त्यांनी नागरिकांना अशा उपक्रमांमध्ये सहभागी होऊन सेवा सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच यापूर्वी ग्रामविकास विभागामार्फत विविध प्रकारच्या सात सेवा सुरू होत्या. आता राज्यसेवा हक्क आयोगामार्फत चर्चा करून एकूण ५९३ प्रकारच्या सेवा ग्रामपंचायतींच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. जिल्ह्यातील ३२९ ग्रामपंचायत मध्ये या सेवा देण्यात येणार असून राज्यातील अशा प्रकारे सेवा देणारा आपला जिल्हा पहिला असल्याचे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक दिवे यांनी सांगितले.

तर जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी आपले सरकार सेवा केंद्र बाबत मनोगत व्यक्त केले व उपस्थितांना माहिती दिली. सिंधुदुर्ग मध्ये AI प्रणाली सुरु केल्यानंतर आताचा हा पुढचा टप्पा आहे. जिल्ह्यात ३२९ ग्रामपंचायत मध्ये ऑनलाइन दाखल्यांची सुविधा निर्माण करणारा आपला जिल्हा पहिला असून या सेवेमध्ये सातत्य ठेवत अखंडपणे सेवा द्या, असे जिल्हाधिकारी अनिल पाटील म्हणाले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग यांनी केले. आपले सरकार सेवा केंद्र ग्रामपंचायत कलमठ येथे सुरू करताना जयेश मेस्त्री व अंकिता राणे यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाच्या समारोपावेळी कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!