विश्वकर्मा मंडळाच्या अपेक्षा पूर्ण करू – ना. निर्तश राणे
पुढील वर्षीच्या बैलगाडी स्पर्धेस प्रथम पारितोषिके पन्नास हजार आपण देऊ – माजी नगराध्यक्ष समीर नलावडे
कणकवली : शहरातील श्री विश्वकर्मा मित्रमंडळ कणकवली सुतारवाडी च्या वतीने आयोजित बैलगाडी शर्यत स्पर्धेत प्रशांत अपराज ( प्रथम क्रमांक) यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला. ४९.२२ सेकंदात या गाडीने अंतर कापले विजेत्या बैलगाडीस रू. २०,०२६ रूपये रोख व ढाल देऊन गौरविण्यात आले.
रमेश पावसकर यांच्या बैलगाडीने द्वितीय क्रमांक (४९.४४ सेकंद) पटकावला. त्यांना १५,०२५ रूपये व ढाल, अभिनव राणे यांच्या बैलगाडीने तिसरा क्रमांक (५०.४४) पटकावला. त्यांना रू.१०,०२५ हजार रोख व ढाल देऊन गौरविण्यात आले. शहरातील निम्मेवाडी येथे ही स्पर्धा मोठ्या जल्लोषात संपन्न झाली. राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी बैलगाडी शर्यत स्पर्धेला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. वैभवी हरमले लांजा (चौथा क्रमांक रू. ७०२५), बिरोबा मानाई लांजा (पाचवा क्रमांक रू.५०२५), आई महालक्ष्मी उन्हाळे (सहावा क्रमांक- रू.३०२५), राजू बागवे कुंदे (सातवा क्रमांक- २०२५ ), साईप्रसाद मोडक (आठवा क्रमांक-रू.२०२५) तर उत्कृष्ट बैलजोडी चंद्रकांत पेडणेकर तसेच उत्कृष्ट जॅकी उत्तम चव्हाण व गावठी बैलजोडीत बबन पांचाळ, विराज पाटकर, राजेश कदम यांना पारितोषिक व ढाल देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे म्हणाले, आपल्या शहरात श्री विश्वकर्मा मित्रमंडळाच्या वतीने अशा स्पर्धा होतात हे प्रथमच कळलं. एकत्र येऊन आपण सर्वजण अशा स्पर्धा भरवता ही कौतुकास्पद गोष्ट आहे. विश्वकर्मा मित्रमंडळाच्या ज्या ज्या काही अपेक्षा असतील किंवा मागण्या असतील त्या पूर्ण करण्याचा प्रशासन, जिल्ह्याचा पालकमंत्री व कणकवलीचा आमदार म्हणून माझी असेल, असा शब्द देखील ना. नितेश राणे यांनी दिला.
या बैलगाडी शर्यत स्पर्धेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष समीर नलावडे हांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मंडळाच्या वतिने माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, श्री विश्वकर्मा मित्रमंडळाने पुढील वर्षी बैलगाडी स्पर्धेचे आयोजन करावे. प्रथम पारितोषिक पन्नास हजार रुपये आपण स्वतः देऊ, असा विश्वास दिला.
पुढे श्री. नलावडे म्हणाले, मी लहानाचा मोठा या सुतारवाडीत झालो. मी येथील लोकांना कधी विसरू शकत नाही. मला अनेकांनी आशीर्वाद दिले. मात्र खरा आशीर्वाद मला सुतारवाडीतील लोकांचा लाभला आहे. यापुढे श्री विश्वकर्मा मित्रमंडळाला जी काही मदत लागेल ती सर्व मदत लागेल ती आमही करू, असा विश्वास दिला. बैलगाडी स्पर्धाच नव्हे तर इतर काही उपक्रम असतील त्याही उपक्रमाना मी व माझे सहकारी तुम्हाला मदत करतील, अस विश्वासही श्री नलावडे यांनी दिला.
यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, उद्योजक रामदास (रामू) विखाळे, माजी नगरसेवक विराज भोसले, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, शहराध्यक्ष अण्णा कोदे, किशोर राणे, बाळू वालावलकर, अंबाजी राणे ( गावपुरुष), माजी नगरसेविका कविता राणे, अशोक तावडे, प्रकाश परब, पिंटू परब, प्रशांत राणे, प्रशांत साटम, चारुदत्त साटम तसेच पशु वैद्यकीय अधिकारी, पोलीस हवालदार राजेंद्र नाणचे व होमगार्ड तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. उबाळे, डॉ. यादव आदी उपस्थित होते.