मा.खा.विनायक राऊत, मा.आ.वैभव नाईक, अरुण दुधवडकर यांचे आवाहन
ओरोस येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हाकार्यकारीणीची बैठक संपन्न
सिंधुदुर्ग : लोकसभा, विधानसभा निवडणुकीत अपयश आले असले तरी त्याला खचून न जाता पक्ष संघटना वाढीचे काम सुरु ठेवा. जनतेची फसवणूक करून विरोधकांनी हा विजय मिळविला आहे. केंद्रात, राज्यात भाजप महायुतीची सत्ता आहे मात्र तरीही जनता विविध समस्यांनी त्रस्त आहे. त्यामुळे जनतेच्या समस्यांवर आवाज उठविण्याचे काम आपण केले पाहिजे. बाळासाहेबांनी आणि उद्धवजींनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नगसेवक, आमदार, खासदार अशा मोठं मोठ्या पदावर काम करण्याची संधी दिली. इतर पक्षात मात्र आयात केलेल्या प्रस्थापितांना संधी दिली जाते. लवकरच जिल्हापरिषद, पंचायत समिती,नगरपंचायत, नगरपालिका निवडणुका होणार आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी आतापासून कामाला लागा असे आवाहन शिवसेना नेते, मा. खा. विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी केले.