16.9 C
New York
Monday, June 16, 2025

Buy now

धोकादायक साकावांचा नागरिकांनी वापर करू नये

माहितीसाठी फलक लावणार

मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ८१३ एवढे साकव आहेत त्यापैकी १६९ साकव सुस्थितीत आहेत. तर ४०६ साकवांची दुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे .तसेच३१३ ठिकाणी नविन साकव बांधने गरजेचे आहे . जिल्ह्यातील नादुरुस्त ४०६ साकवांच्या दुरुस्तीसाठी ३३ कोटीची तर नवीन३१३ ठिकाणी साकव बांधण्यासाठी 97 कोटी निधीची गरज आहे मात्र सध्या स्थितीत पावसाळा सुरू असल्याने नादुरुस्त धोकादायक साकवांचा नागरिकानी वापर करू नये. यासाठी अशा धोकादायक साकवांच्या दोन्ही बाजूला जिल्हा परिषदेमार्फत फलक लावण्याची मोहीम हाती घेणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली .

पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती घेताना सांगितले की सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८१४ एवढे साकव आहेत त्यापैकी १६९ साकव सुस्थितीत आहेत. तर उर्वरित साकवाचा वापर केला जात नाही पर्यायी मार्ग आहे . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नादुरुस्त ४०६साखर दुरुस्त करण्यासाठी ३३ कोटी निधीची आवश्यकता आहे तसेच जिथे नवीन साकव बांधणे आवश्यक आहे अश्या ३१३ ठिकाणी साकव बांधकामासाठी ९७ कोटी रुपये निधीची गरज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सद्यस्थितीत जिल्हा परिषदेमार्फत तीन साकवाची बांधकाम केले जात आहे तर सार्वजानिक बांधकाम विभागा कडून २२ साकव बांधकामे सुरु आहेत .

सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. नदी नाल्यांना पूर आला आहे त्यामुळे धोकादायक साकवांचा नागरिकांनी वापर करू नये पर्यायी मार्गाचा वापर करावा यासाठी जिल्हा परिषदेमार्फत अशा धोकादायक साकवाच्या दोन्ही बाजूला फलक लावण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे.अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!