आज पर्यंत आठ ते दहा नागरिकांवर हल्ले
नगरपंचायत प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा ; नागरिकांची मागणी
कणकवली : कणकवली शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. शहरातील ठिकठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून गाडयांवर धाऊन जाणे व नागरिकांवर हल्ला करण्याचा प्रकार वाढले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नगरपंचायत प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
शहरासह आजूबाजूच्या परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नागरिक मोकळया जागेत कचरा आणि शिळे अन्न टाकत आहे. तसेच चिकण, मटण सेंटरच्या परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी कुत्र्यांची पडक करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची मोहीम नगरपंचायतीने काही वर्षांपूर्वी राबविली होती. मात्र, ही थंडावली आहे. परिणामी अनेक चौकांमध्ये भटक्या कुत्र्यांनी ठिय्या मारल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. हे कुत्रे गाडयांच्या व नागरिकांच्या मागे लागतात. काही ठिकाणी कुत्रे नागरिकांचा अंगावर धाऊन हल्ला करीत असल्याचे प्रकार घडत आहेत. रात्रीच्यावेळी रस्त्यावर नागरिकांनादेखील हे कुत्रे त्रास देतात. भटके कुत्रे लाहन मुलांवर हल्ले देखील करीत आहेत. नगरपंचायत प्रशासनाने कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या काही महिन्यांत भटक्या कुत्र्यांना चावा घेण्याचे तसेच हिंसक होण्याचे प्रमाण वाढले आहे. या कुत्र्यांच्या दहशतीमुळे कणकवली शहरातील नागरिक भीतीच्या छायाचे आहेत.त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पकड मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.