20.8 C
New York
Thursday, June 5, 2025

Buy now

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या!

ठाकरे शिवसेनेची कुडाळ तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी

कुडाळ : अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे तसेच बागायतदार आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानी पंचनामे करताना कोणतेही जाचक अटी न लावता सरसकट पंचमाने करून शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कुडाळ तालुक्याच्या वतीने तहसीलदार विरसिंग वसावे यांच्याकडे करण्यात आली.

ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज तहसीलदार श्री.वसावे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यात म्हटले आहे की, सर्व नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी. यासाठी आपण तात्काळ पाठपुरावा करावा. तसेच काही अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यासाठी टाळाटाळ करत आहे. शेतकऱ्यांना अरेरावीची उत्तरे देत आहेत. तरी आपण संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी ठाकरे शिवसेनेने केली.

यावेळी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, अतुल बंगे, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, शहर निरीक्षक सुशील चिंदरकर, उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर, शहरप्रमुख संतोष शिरसाट, उपशहर प्रमुख गुरू गडकर, गंगाराम सडवेलकर, संदीप म्हाडेश्वर मंगेश बांदेकर आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!