मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर पक्षात नाराज असल्याची चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात रंगू लागली आहे. ‘पक्षात निष्ठावंतांना कवडीचीही किंमत नसते’ या त्यांच्या स्टेट्समुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे वैभव खेडेकर राज ठाकरेंची साथ सोडणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे.