कणकवली : १५ वित्त आयोगअंतर्गत कलमठ गावातील शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप करण्यात आले. इंद्रायणी आणि शुभांगी या बियाण्याचे वाटप करण्यात आले. दरवर्षी शेतकऱ्यांना भात बियाणे व खते ग्रामपंचायत मोफत वाटप करते.
यावेळी सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, सदस्य पपू यादव, अनुप वारंग, दिनेश गोठणकर, स्वाती नारकर, सोसायटी चेअरमन बबन गुरव उपस्थित होते. दरम्यान यावेळी शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.