रस्ता रुंदीकरण कामातही दिरंगाई नको
पालकमंत्री नितेश राणे यांच्या अधिका-यांना सुचना
वैभववाडी शहरातील गटारे व रस्त्याची मंत्री नितेश राणे यांनी केली पाहणी
वैभववाडी : पावसाने थोडी उसंत घेतली आहे. त्यामुळे दिवस-रात्र काम करून वैभववाडी शहरातील रस्त्याचे काम व गटार काम पूर्ण करा. गटार तुंबून नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या. अशा सुचना पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
वैभववाडी शहरात पावसामुळे गटारे तुंबली तसेच सुख व शांती नदी दरम्यान रस्ता रुंदीकरणात खुदाई करण्यात आल्याने रस्ता चिखलमय झाला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी रस्त्याची व गटाराची पाहणी केली.
यावेळी भाजपा अध्यक्ष सुधीर नकाशे, प्रांताधिकारी जगदीश कातकर, मुख्याधिकारी प्रतीक थोरात, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते, ठेकेदार श्री. वेल्हाळ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गटाराचा प्रश्न किती दिवसात सुटणार अशी विचारणा त्यांनी अधिकाऱ्यांना केली. पाऊस कमी झाल्यास लवकरच रस्ता काम व गटाराचे काम पूर्ण केले जाईल असे अधिकारी अतुल शिवनीवार यांनी सांगितले.
वैभववाडी शहरात सर्वात जास्त पाऊस पडतो. पावसाचा अंदाज घेऊन दिवस रात्र काम करून हा विषय मार्गी लावा. अशा सुचना पालकमंत्री यांनी दिल्या. जिल्हा वीज वितरण च्या नियंत्रण कक्षाचा कारभार पाहायचा होता. म्हणून त्या ठिकाणी अचानक भेट दिली. कारण या खात्याचे मंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत. जिल्ह्यातील वीज वितरणच्या देखभाल दुरुस्तीसाठी 70 कोटीची तरतूद करण्यात येणार आहे असे सांगितले. फोंडाघाट रात्रीच्या वेळी सुद्धा सुरू करून गैरसोय दूर केली जाईल संबंधित खात्याशी याबाबत बोलतो असे सांगितले. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.