16.5 C
New York
Monday, June 2, 2025

Buy now

अहिल्याबाई होळकर यांच्या राज्यकाभाराचा अभ्यास सर्वांनी केला पाहिजे ; पालकमंत्री ना. नितेश राणे

अहिल्याबाई होळकर यांनी, आदर्श, पारदर्शक, लोकाभिमुख कारभार केला

कणकवली : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पुण्यशोक अहिल्याबाई होळकर यांच्यासह महापुरुषांनी सनातन हिंदू धर्म व हिंदू संस्कृतीचे रक्षण केले नसते तर आज आपण हिंदू म्हणून जगू शकलो नसतो. अहिल्याबाई होळकर यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी आहे. अहिल्याबाई होळकर यांनी, आदर्श, पारदर्शक, लोकाभिमुख कारभार केला. अहिल्याबाई या उत्तम राजकर्त्या होत्या. अहिल्याबाई होळकर यांनी केलेल्या राज्यकाभाराचा अभ्यास सर्वांनी केला पाहिजे. अहिल्याबाईंच्याच्या विचारांचा जागर भाजप युवा मोर्चाने एक दिवस न करता ३५६ दिवस केला पाहिजे. महापुरुषांचा इतिहास भाजपच्या कार्यकर्त्यांनी वाचवा, असे आवाहन पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले.

अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त सिंधुदुर्ग जिल्हा भाजप युवा मोर्चा यांच्यावतीने प्रहार भवन येथे युवा प्रेरणा मेळावा आयोजित केला होता. याचे उद्घाटन पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष मनीष दळवी, भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, जिल्हा बॅंकेच्या संचालिका प्रज्ञा ढवण, भाजप युवा मोर्च्याचे प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले, भाजपच्या अनुसूचित जाती जमाती विभागाचे जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, कणकवली मनोज रावराणे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस संतोष पुजारे, जावेद खतीब, रुपेश कानडे , ललित चव्हाण, राकेश सावंत, हेमंत गावडे, भूषण अंगचेकर, देवेंद्र शेटकर , पराशर सावंत, सर्वेश दळवी, समीर प्रभुगावकर,अमित साटम, अतुल सरवटे,सागर राणे, सुमित सावंत, जयेश चिंचाळकर, प्रणव वायंगणकर, सिद्धेश कांबळी, साई सावंत, संजय नाईक, रोहन रावराणे, अक्षय पाटील, प्रशांत राणे, सुनील बांदेकर , नयन दळवी, प्रज्वल वर्दम आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे ना. नितेश राणे म्हणाले, आरएसएस संघटना व भाजप पक्षातर्फे महापुरुषांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी वर्षभर विविध कार्यक्रम घेतले जातात. देशातील भाजप एकमेव असा पक्ष आहे, तो महापुरुषांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, अहिलाबाई होळकर यांच्यासह महापुरुषांनी हिंदू धर्म व संस्कृती टिकवण्यासाठी मुघल साम्राज्याच्याविरोधात लढा दिला. त्यांनी हा लढा दिला नसता तर आपण आज हिंदू म्हणून जगू शकलो नसतो. अहिलाबाई होळकर यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी आहे. त्यांचा जीवनप्रवास पुस्तक स्वरुपात उपलब्ध असून भाजपच्या युवा कार्यकर्त्यांनी जीनवप्रवास वाचला पाहिजे. अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या कालखंडात हिंदुंची मंदिरे सुरक्षित ठेवण्याची काम करण्याबरोबर मुघल साम्राज्यांनी हिंदुंची पाडलेली मंदिरांची पुन्हा उभारणी केली. देव-देवींची मंदिरे ही हिंदूसाठी प्रतीके आहेत. आरएसएस व भाजप पक्ष देश घडविण्याचे काम करीत असून हिंदू धर्माच्या रक्षणासाठी काम करीत आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. महापुरुषांचा इतिहास हा महान असून या इतिहासाचे वाचन युवा कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन राणेंनी केले. देशातील समुद्र किनारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा सर्वांत उंच पुतळ्या उभारण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने केले. याशिवाय संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारण्याचे काम महायुती सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्याचा धाडसी निर्णय महायुती सरकारने घेतला. याचा मला सार्थ अभिमान आहे, असे राणे म्हणाले.

माजी आ. प्रमोद जठार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, अहिल्याबाई होळकर यांचा इतिहास महान आहे. त्यामुळे भाजपच्या युवा कार्यकर्त्यांनी व युवा पिढीने शिवराय, शंभूराजे, अहिल्याबाईंचे जीवनचरित्र वाचले पाहिजे. अहिल्याबाईंचे चरित्र हे देशवासीयांसाठी मोटीव्हेशन आहे. आरएसएस संघटना व भाजप पक्ष हा राष्ट्रहितासाठी काम करतो. भारतीय समाजाला इतिहास विसरण्याचा शाप असून इतिहासाचे विस्मरण समाजाला होऊ नये, याकरिता आरएसएस संघटना व भाजप पक्ष महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी दिनी त्यांच्या इतिहास सांगण्यासाठी विविध कार्यक्रम घेत आहे. शिवराय, शंभूराजे, अहिल्याबाई यांचे जीवनचरित्र प्रत्येकाने वाचले पाहिजे. ठाकरे कुटुंबाचा शिवसेना पक्ष आहे, पवार कुटुंबावर राष्ट्रवादी पक्ष आहे. मात्र, भाजप हा एकमेव पक्ष आहे, जो कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. अहिल्याबाई होळकर यांनी प्रजेची काळजी घेतानाच आदर्श, पारदर्शक, लोकाभिमुख कारभार केला. त्यामुळे त्यांचे जीवनचरित्र युवा पिढीने वाचले पाहिजे. भगवान शंकर हे हिंदूचे प्रतीक असून अखंड हिंदूस्थान करण्यासाठी आता हिंदूंनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकांमध्ये शतप्रतिशत भाजपासाठी युवा कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागावे आणि पाच युवक पक्ष संघटनेशी जोडवावेत, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविकेत लखमराजे भोसले यांनी अहिल्याबाई होळकर यांची जयंतीनिमित युवा प्रेरणा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यामागील उद्देश सांगितला.

यावेळी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नीलम जाधव, विधी मुद्राळे, नेहा देसाई, यांचा भाजप युवा मोर्चाच्या वतीने पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तर दहावीच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या विधी चिंदरकर हिचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.

त्याचप्रमाणे भाजप युवा मोर्चाचे नूतन तालुकाध्यक्ष पप्पू परब, संतोष राऊळ, दीपक गवस, भाई सावंत यांचा मंत्री राणेंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सूत्रसंचालन श्रीकृष्ण परब यांनी केले. आभार संदीप मेस्त्री यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमात घोषणाबाजी

छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा विजय असो, भारत माता की, वंदे मातरम अशी घोषणाबाजी करण्यात आली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!